Posts

Showing posts from May, 2016

नवजा धबधब्याच्या गमजा

Image
  ती न ऋतुंमधला आवडता ऋतू कोणताय़ या प्रश्नाला उत्तर देणं खरंच अवघड आहे. आपल्या परीनं तीनही ऋतू चांगलेच असतात. अगदीच डावं-उजवं करायची वेळ आल्यास, आपल्यापैकी अनेकजण झट्कन पावसाळा हेच उत्तर देतील. पण उन्हाळाही महत्त्वाचा असतोच. उन्हाळाच नसेल, तर ढग कसे तयार होणार आणि ढग तयार झाले नाहीत, तर पाऊस कसा पडणार? काही लोकांना हिवाळा आवडतो. तो असतोच आवडण्यासारखा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कारणांमुळे एखादा विशिष्ट ऋतू आवडतो. आपल्याला तर बुवा सर्वच ऋतू आवडतात. पावसाळा विशेष आवडीचा एवढंच! पावसाळा म्हणजे मनमुराद भटकंती करण्याची संधी. शहरांमधून जेव्हा लोक छत्र्या आणि रेनकोट घालून किंवा मोटारीच्या काचा लावून "काय हा पाऊस', असं म्हणत असतात, तेव्हा आमच्यासारखी भटकी मंडळी भर्राट वारा आणि पावसाच्या लाटा अंगावर घेत गिरी-कंदरांचा धांडोळा घेत फिरत असतात. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, चोहीकडे पसरलेलं हिरवंगार साम्राज्य, दुथडी भरून वाहणाऱया नद्या आणि गिरी शिखरावरून समुद्रसपाटीकडे खळाळत वाहणारे ओढे, चिंब भिजलेली धरणी, आभाळाला आणखी बरस अशी वारंवार विनवणी करत असते. निसर्गाच्या सान्निध्यात असत