Posts
पर्यटन छायाचित्रणः आठवणींची साठवण
- Get link
- Other Apps
ठे विले अनंते तैसेचि राहावे, या संतांच्या शिकवणीचा मराठी माणसांवर भलताच परिणाम झाला असावा. निकड असल्याशिवाय मराठी माणूस शक्यतो प्रवास टाळत असे. किमान विसाव्या शतकात तरी हीच स्थिती होती. त्याला कारणंही बरीच होती म्हणा. पैसा हे महत्त्वाचं कारण. मराठी माणूस फारसा कधी धंद्यात दिसत नव्हता. साहजिकच नोकरी करण्याशिवाय त्याला गत्यंतरच नव्हतं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तर एसएससी झाल्यानंतर सरकारी नोकरीत स्वतःला चिटकवून घेतलं, की लग्नाच्या बाजारात तो मिरवायला मोकळा असायचा. पर्यटनाबद्दलची नाराजी ही आर्थिक कारणांमुळंही होती. फुकटचा दवडायला लोकांकडे पैसाच नसायचा. तसा पगारही तुटपुंजाच असे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मात्र परिस्थितीनं अचानकच वळण घेतलं. पगार वाढले, पैसा हातात खुळखुळायला लागला आणि मग सुरू झालं भटकणं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून हिमालयातल्या बर्फाळ वाटा तुडवण्यात त्याला मजा वाटू लागली आणि सुरू झाली पर्यटनाची पहाट. पर्यटनाला जाताना प्रत्येकाकडे कॅमेरा असेलच असं नाही. बाजारात हळूहळू चांगले कॅमेरे येऊ लागले होते. कॅनन, निकॉन, ऑलिंपस, फुजीफिल्म, सोनी यांसारख्या कंपन
आनंदी लोकांचा देश -.भूतान
- Get link
- Other Apps
ब्लॅक नेक्ड क्रेन चा र दिनकी चाँदनी, फिर सुहानी रात...अशा अर्थाची एक म्हण हिंदीत आहे. काही विशेष काम नसल्यानं बरेच दिवस संथ जीवन ढकलत आयुष्य जगणाऱ्या माणसाला एखादा आशेचा किरण दिसल्यानंतर तो जसा आनंदित होतो, असाच आनंद आम्हाला झाला होता. म्हणजे आमची सुहानी रात सुरू होण्याचा चान्स नक्की होता. हल्ली कोणत्याही प्रकारचा आशेचा किरण दिसला, तरी आनंदित होण्याचा आम्ही पायंडा पाडला आहे. आनंद, मग तो फोटोग्राफीचा असो, किंवा प्रवासाचा...या दोन्ही गोष्टी अंतर्बाह्य आनंदित करणाऱ्या आहेत अस आम्ही मानतो. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये प्रथम रणथंभोर आणि नंतर जूनमध्ये उत्तराखंडाचा दौरा केल्यानंतर भूतानला जाण्याचा कल्पना आमच्या कंपूत मांडली गेली. आमचा कंपू आहे साठीपलिकडचा पण 'साठी बुद्धी नाठी' आम्हाला लागू नाही. ती सर्वांनी भलतीच उचलून धरली, इतकी की आमच्या चारूदत्त देशपांडे नावाच्या मित्रानं सर्वांना फोन करून केवळ कल्पना दिली आणि कोणाची अनुमती न घेता रिझर्व्हेशनची तयारी चालवली. कोणी नकारघंटा वाजवण्यापूर्वी रिझर्व्हेशन करून चक्क मोकळे झाले. आमचे मित्र कुमार जोगळेकर आणि मुंबईचा पु
लोकेशन...सिंहगड व्हॅली
- Get link
- Other Apps
व्हर्डिटर फ्लायकॅचर प हाट झाली, भैरू उठला. कॅमेरा, लेन्स, ट्रायपॉडची जुळणी केली आणि स्वयंचलित दुचाकीवर टांग मारून ४० च्या वेगानं भरधाव निघाला. झुंजूमुंजू होण्यापूर्वी त्याला मोक्याची जागा पकडायची होती. मिळेत ते शॉर्टकट घेत त्याचं वाहनरुपी वारू महामार्ग, कच्चे-पक्के रस्ते, खाच-खळगे पार करत चौखूर धावू लागलं. कितीही घाई केली, तरी भैरूला पोचायला ३५ मिनिटं लागलीच. योग्य ठिकाणी जाऊन मोक्याची जागा पकडण्यासाठी त्याची सारी धडपड व्यर्थ गेली...कारण ...कारण? सर्वांत आधी पोचण्यासाठी लवकर उठावं लागतं आणि स्नानाला बुट्टी मारून थेट जागा धरण्यासाठी पळावं लागतं, हे केवळ त्यालाच नाही, तर सर्वांनाच माहित असतं. त्याच्याआधीच ५-७ जण पूर्ण तयारीनिशी 'फ्रेमी'त एखादा पक्षी गावण्याची वाट पाहात बसले होते. म्हणजे कल्लाच की हो...! इतक्या पहाटे येण्याची कारणं दोन. पहिलं म्हणजे अर्थातच जागा धरणं आणि दुसरं म्हणजे इतर कुणी येण्याआधीच एखादा वेगळा पक्षी गावलाच, तर सोनेपे सुहागा! वेगळा पक्षी गावणं सोनेपे सुहागा असलं, तरी पहाटेच्या अंधुक उजेडात 'आयएसओ' वाढवूनच फोटू घ्यावा लागतो. नंतर त्याव
विहंगभूमी नैनिताल
- Get link
- Other Apps
अॅशी बुलबुल का ही वेळा काही कार्यक्रम ध्यानीमनी नसताना आखले जातात. दांडेलीचा कार्यक्रम असाच अचानक ठरला होता. काही कार्यक्रम मात्र अनमानधपक्यानं ठरवता येत नाहीत. त्यासाठी योग्य नियोजनच हवं असतं. उत्तराखंडचा कार्यक्रम त्यापैकीच एक. परंतु, तो देखिल रामभरोसेच होता. नियोजन केलं होतं, ते फक्त रेल्वेचं बुकिंग करण्यासाठी. पण हॉटेलांचं बुकिंग, फिरण्यासाठी लागणारी गाडी याचा थांगपत्ताही नव्हता. जे काही करायचं ते तिथं जाऊनच, हा आमचा निर्धार फोल ठरणार की फायदेशीर, हे प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतरच समजणार होतं. तिकिटांसाठी प्रयत्न सुरू केले ते जाण्याच्या दिवसाच्या तीन आठवडे आधी. तिकिटं मिळण्याची शक्यता धूसरच होती. पण आश्चर्य म्हणजे ती चक्क मिळाली आणि ती देखिल कन्फर्म! अलिकडे विमानप्रवास ही काही श्रीमंतांची किंवा कंपन्यांच्या खर्चात फिरणाऱ्यांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. भुर्रकन दोन-चार तासांत देशाच्या कानाकोपऱ्यात या आकाशगमनी वाहनानं जाता येतं. वेळ वाचतो हे खरं असलं तरी, काही गोष्टींना आपण मुकतो हे देखिल तितकंच खरं आहे. कार्यालयीन कामासाठी मी देखिल कंपनीच्या खर्चानं अनेकवेळा विमानप्रवास केल
अशाच एका 'रम्य' सकाळी...
- Get link
- Other Apps
र म्यतेबाबत प्रत्येकाचं मत निराळं असू शकतं. पावसाळी वातावरणातली सकाळ ही रम्य कशी असू शकेल, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पडू देत बापड्यांना. एखादी गोष्ट आपल्याला कशी वाटते, हे महत्त्वाचं. इतरांना काय वाटतं याचा आपण फारसा विचार करू नये. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. तर सांगायचा मुद्दा असा, की सर्द पावसाळ्यातली ती एक रम्य सकाळ होती. खरं तर पहाटेच उठून आम्ही मार्गाला लागलो होतो. मार्ग होता सातारा रस्त्यावरूनच. आमचं गंतव्य स्थान आणि आम्ही यांच्यामध्ये खेड शिवापूर ओघानंच येतं. या गावातील गणेश प्रसाद हॉटेलातली झणझणीत मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढं जाणं शक्यच नसतं. ...तर आम्ही मिसळीवर यथेच्छ ताव मारून भोरच्या दिशेनं गाडी हाकली. वरंध घाटातून निसर्गशोभा पाहात आणि शक्य तिथं थांबून छायाचित्रं काढण्याचा आमचा कार्यक्रम अखंडितपणे चालू असतो. परिणामी तीन तासांच्या प्रवासासाठी आम्हाला किमान पाच तास तरी मोजावे लागतातच. पण आज निसर्गाचंच काहीतरी बिनसलं होतं. भोर मागं टाकेपर्यंत पावसाची अखंड झोड चालू होती. मित्राच्याच मारूती नामक कंपनीनं तयार केलेल्या जिप्सी जातीचं वाहन आम्ही घेतलं होतं. पावसाळ