...आणि अनुभवले थरारक क्षण! (कथा रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील शिकारीची) सो यी-सुविधांची उपलब्धता जशी वाढत जाते, तशी माणसाची सुखाची व्याख्या बदलत जाते. आता हेच पाहा ना, सुमारे ४० वर्षांपूर्वीची धुरांच्या रेषा हवेत सोडत झुकझुक करत जाणारी आगीनगाडी जाऊन 'भों' करत चालणारी वाऱ्याशी स्पर्धा करत डिझेल इंधनावर धावणारी रेल्वे आली. पूर्वी केवळ 'फर्स्ट क्लास' हाच 'एअर कंडिशण्ड' होता, आता दुसऱ्या वर्गालाही ती सुविधा मिळाली आहे. पण गाडीतून फिरण्याची त्या वेळची मजा काही आता उरलेली नाही. कोळशानं काळेमिट्ट झालेले चेहरे आणि कपडे धुवून आया काकुळतीला येत. आता दोन हजार किलोमीटरच्या प्रवासानंतरही लोक ताजेतवाने असतात. हा काळाचा महिमा आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की अस्मादिक आपल्या सात इष्टमित्रांसह इतरवेळी सूर्याच्या धगीनं होरपळून निघणाऱ्या, पण केवळ याच दिवसांत शीतल असणाऱ्या राजस्थानातील रणथंभोरच्या अभयारण्याकडे निघालो होतो. आमचे मित्र चारूदत्त देशपांडे यांनी यापूर्वी चार-पाच वेळा रणथंभोरला भेट दिल्यामुळे, आमच्या आठ जणांच्या टीमचं नेतृत्त्व ओघानंच त्यांच्याकडे आलं. रेल
Comments
Post a Comment